मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
अंधाराच्या ढिगार्यात जेव्हा प्रकाशाचा एकही कण सापडत नाही ... माणसांच्या तुडुंब गर्दीत जेव्हा कोणीही आपलेस वाटत नाही... कर्तुत्वाच्या शिखरावर जेव्हा आनंद व समाधान हिरावून घेतल्या जातो... चेहऱ्यावरचे बनावटी हास्य जेव्हा आतून पोखरून गेल्याची जाणीव होऊ देत नाही... निराशेच्या खाईत जेव्हा मदतीचा हात मिळत नाही... असंच काहीसं तुझ्या सोबत झालेल असेल पण आम्ही कोणीही समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ 9420461580 डिप्रेशन या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या सर्वांना समर्पित...