मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
लहान मुले ही मुळातच इतरांपेक्षा अधिक संवेदनशील असल्यामुळे आजूबाजूच्या घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांचाही प्रभाव लहान मुलांवर विलक्षण पद्धतीने होत असतो. लहानपणी बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे संतुलन वेळेतच न साधल्यास त्याचे रूपांतर कालांतराने चुकीची विचार प्रणाली, व्यक्तिमत्व निर्मिती व चुकीच्या वर्तनाला जन्म देणारी घटना ठरू शकते. पालकत्वाची जबाबदारी आनंद व तणाव या दोन्ही भावनांच्या मिश्र प्रवाहातून जात असताना आपल्या मुलाचा मानसिक आरोग्याचा क्षणभर का होईना विचार करणे खूप गरजेचे असल्याचे जाणवत आहे . आणि म्हणूनच शालेय मुलांना विविध मानसिक, बौद्धिक, वर्तनात्मक व विचारात्मक समस्या असू शकतात हे सर्व पालकांनी जाणून घेतले पाहिजे. मुलांच्या विविध मानसिक समस्या जर पालकांनी लक्षात घेतल्यास स्वतः पालकांना व आपल्या मुलाला योग्य ते मानसशास्त्रीय मदत व समुपदेशन मिळू शकते. शालेय मुलांच्य विविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांपैकी महत्त्वाच्या मानसिक समस्या वा आजार पुढीलप्रमाणे असू शकतात. (1) स्पेसिफिक रीडिंग डिसॉर्डर: य...