मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
आपण सर्वांनाच सुंदर, रंगबिरंगी व आकर्षक असणारे फुलपाखरू आवडतात... पण फुलपाखरू बनण्याचा जीवनप्रवास खूपच खडतर व क्लेशदायक असतो... साधारण एका छोट्याशा बीजांडा पासून सुरवंटाचा (caterpillar) फुलपाखरू बनवण्याचा जीवन प्रवास सुरू होतो.... हळूहळू शारीरिक आकारमान वाढत राहिल्यामुळे छोट्याशा बीजांडा राहणे त्या सुरवंटाला असाह्य होत राहतं...हा त्रास कमी कि काय जेव्हा बीजांडा मधून बाहेर पडण्याची यायची वेळ होते तेव्हा... बीजांडाचे कवच फुटता फुटत नाही... एकीकडे सुरवंटाचे वाढलेले शारीरिक आकारमान व बीजांडाचे न फुटणे त्यामुळे त्याला प्रचंड कोंडमारा सहन करणे क्रमप्राप्त असते... पण तरीही सुरवंट आपला प्रयत्न सोडत नाही.. पूर्ण ताकदीनिशी बीजांडाला धडक मारत राहतो... व एक दिवशी यशस्वी पण होतो... जो सुरवंट हे करू शकला नाही त्याला बिजांडातुन बाहेर येणे शक्य नसतं... ह्या सर्व जीवन प्रवासात एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की... शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेवरच ह्या सुरवंटाचे जन्म व फुलपाखरू बनणे अवलंबून असतं... जे सुरवंट आपली मान...