मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
विचार करण्याची क्षमता हा मानवी उत्क्रांतीचा महत्त्वाचा पाया आहे... आज तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा मानवी विचारांचे महत्त्व अबाधित आहे... विचारांची शृंखला पुढे जाऊन कृतीत परावर्तित होत असते (our thoughts reflects in our action and behaviour) त्यामुळे आपली कृती ही आपल्या विचारांचेच प्रतिनिधित्व करीत असते...सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनात वेगवेगळे विचार आपल्या मेंदूमध्ये येणे स्वाभाविक असले तरी त्यावरचे नियंत्रण सतत राखणे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते...
जेव्हा व्यक्ती आपल्या सतत येणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास अयशस्वी ठरतो व सततचा अतीविचारांचा ओघ वाढत राहतो तेव्हा निर्माण झालेला एक विचार... पुढच्या दुसऱ्या विचाराला निर्मित करतो व विचारांची ही सर्कस सुरू होते... महत्त्वाची बाब म्हणजे निर्माण झालेल्या अतिविचारांची ही मालिका त्या व्यक्तीच्या वैचारिक पद्धतीचा मुख्य भाग बनते... निर्माण झालेले अतिरिक्त विचार हे मुळातच कुचकामी, निरर्थक व दिशाहीन असतात...
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अतिशय निरर्थक विचारांच्या ट्रॅफिक मुळे व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढणे, लक्ष केंद्रित न करू शकणे, झोप न येणे, सतत ताण तणाव अनुभवणे व मानसिक थकवा यासारख्या मानसिक आजाराच्या लक्षणांना सुरुवात होतेत.... एकंदरीतच च्युंगम रुपी विचार सतत चघळत राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होते...
अति विचाराचे हे दृष्टचक्र वेळीच थांबवण्यासाठी प्राथमिक स्वरूपात व्यक्तीचे विचारचक्र तोडण्याची (थॉट ब्रेकिंग) गरज असते.... कॉग्निटिव्ह थेरपी चा उपयोग केल्यास व्यक्तीला मोठ्या प्रमाणात अतिविचारावर नियंत्रण करण्याचे कौशल्य मिळवता येऊ शकते.... गरज आहे वेळीच आपल्या विचार चक्राला समजण्याची त्याला थांबवण्याचे सामर्थ्य व कौशल्य निर्माण करण्याची व त्याला अटकाव निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशनाची...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment