Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

स्वच्छता मनाच्या स्टोअर्सची.....

आपल्या  मनाला  (मेंदूला ) दोन प्रकारचे  स्टोअर्स (भंडार) असतात पहिले म्हणजे  बोधात्मक मन (conscious mind) व दुसरे म्हणजे अबोध मन (unconscious mind). बोधात्मक मनामध्ये असलेली माहिती आपल्याला ज्ञात असते परंतु अबोध मनामध्ये आपणच संचय केलेली माहिती त्याबाबत आपण अनभिज्ञ असतो.  बऱ्याचदा आपल्या आयुष्यात आलेल्या विविध दुःखदायक, त्रासदायक, निराशावादी घटना, त्रासदायक व्यक्तीमत्वे, सहवास, शाब्दिक संभाषण, नातेसंबंध, कटू आठवणी या सर्व त्रासदायक बाबी आपला अंतर्गत  म्हणजेच  अबोध मन (मेंदू) दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यालाच मनाचा डिफेन्स मेकॅनिझम असे म्हणतात.  आपल्या मनाला त्रासदायक, दुःखदायक असणार्‍या घटना आपलं मन (मेंदू) नेहमीच दाबून  टाकण्याचा (supress) प्रयत्न करीत असतो कारण त्या आठवणी वा घटनां सोबत राहणे मानसिक त्रासदायक ठरत. नेहमीच सप्रेस (मनाने दाबून टाकलेली अंतर्गत दुःखदायक बाब, घटना आपल्याला आत्मिक शांतता प्रदान करेलच असं नाही).  अंतर्गत मानाच्या अबोध मनाने  दाबून टाकलेली दुःखदायक  बाब, घटना वा प्रतिक्रिया त्याचे व्यवस्थित मन...

मानसशास्त्रीय धोक्याचे पालकत्त्व....

बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो.याच काळात व्यक्तीची  शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो. पालक म्हणून आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा अशी मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो. परंतु  गेल्या काही काळापासून पाल्य व पालकत्व याबाबत मानसशास्त्रीयस्तरावर अनेक गंभीर प्रश्न  समोर येताना दिसतात आणि त्याची  मूळ कारणे  शोधणे गरजेची वाटतात. मानसशास्त्रीय स्तरावर निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांना एक पालक म्हणून आपण वेळीच पायबंद घालू शकतो आणि त्यासाठी खालील चुका आपण कळायला पाहिजे.  पालक म्हणून आपण खालील चुका टाळू शकतो. (1) आपल्या मुलांची इतर  मुलांसोबत तुलना करणे  (2) मारहाण करणे  (3) शिवीगाळ करणे  (4) शारीरिक दृष्ट्या कष्टदायक काम करायला लावणे  (5) नेहमी अपमान करणे  (6) भावंडांमध्ये भेदभाव करणे  (7...