आपल्या सर्वांच्या आयुष्यात निर्माण होणारे मान-अपमान हे मुळातच भ्रम निर्माण करणारे असतात...आपली इतरांना 'उपयोगिता' असल्यास आपल्याला मानसन्मान मिळतो... त्याचप्रमाणे आपण इतरांना जर गैरसोयीचे असेल तर बऱ्याचदा आपल्या वाट्याला अपमानाचे प्रसंग निर्माण होतात...यातही विशेष म्हणजे आपण सर्वांना खोटा का असेना मानसन्मान मिळत राहावा अशी आपली मनोमन इच्छा असते...परंतु त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेल्या अपमानाच्या प्रसंगातून आपण निराश होतो, खचतो, चिडतो आयुष्यभर त्याप्रसंगाचा सूड घेण्याचा प्रयत्न करतो... कालांतराने आपल्या लक्षात येते की आपल्याला मिळालेला मान आणि अपमान दोन्हीही भ्रम असून आपणच त्या भ्रमाला वास्तविकतेचे रंग दिलेले आहे..आज पासून माझ्या वाटेला आलेल्या मान व अपमानाच्या प्रसंगांमध्ये मी मानसिक व भावनिकरित्या स्थिर राहील असा संकल्प घेत आहे 😊😊 have a wonderful day to all of you..
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य कौन्सिलर
मनोसंतुलन उपक्रम
बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले... गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते... शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...
Comments
Post a Comment