मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
लहानपणापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची 'भीती' (fear) दाखवण्यात येते...किंवा आपल्या मनामध्ये किंबहुना ती 'निर्माण' करण्याचा प्रयत्न आपल्या घरातील मंडळी किंवा आपल्या आजूबाजूचे लोक 'अनावधानाने' करीत राहतात.... अंधाराची भीती, कुणीतरी पकडून घेऊन जाईल, तू पडशील लागेल, तू ऐकले नाहीस तर तुला मार पडेल, खूप अभ्यास कर नाहीतर आयुष्य 'खडतर' आहे...अशा एक ना अनेक भीती सदैव आपला 'पाठलाग' करीत असतात... पुढे मोठे झाल्यानंतर भीतीचे 'स्वरूप' बदलून वेगवेगळ्या प्रकारच्या भीती 'आपण' किंवा आपल्या आजूबाजूचे लोक तयार करीत असतात...चांगलं करिअर हवं, पाठीशी पैसा हवा, मोठ्या लोकांशी ओळखी मी आजारी पडेल का?, माझा अचानक एक्सीडेंट किंवा मृत्यू तर होणार नाही? या जगामध्ये माणसाने 'स्मार्ट' असावं, कुठल्या का मार्गाने होईना पण भरपूर यश, प्रसिद्धी व संपत्ती मिळवली पाहिजे... यशाच्या आणि अपयशाच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या भीती 'सदैव' आपला पाठलाग करीत राहतात... माझ्या रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप निर्माण होईल का? ती किंवा तो मला समजून घेईल का? त्याच्यासोबत ख...