Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

रेडीमेड पालकत्व.....

बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो.याच काळात व्यक्तीची  शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो. पालक म्हणून सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा याची मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो.परंतु  गेल्या काही काळापासून  पाल्य, पालकत्व व एकूणच शिक्षण व्यवस्था  याबाबत  गंभीर प्रश्न  समोर येताना दिसतात  आणि त्याची  मुळे शोधणे गरजेचे वाटतात. हल्लीच्या पालकत्वाची संकल्पना पूर्णपणे पाश्चिमात्य देशाच्या विचारसरणीवर आधारित होताना दिसत आहे.  मुलाच्या/ पाल्याच्या जन्माबरोबरच त्याची शाळा, शिक्षणाचे माध्यम, ट्युशन क्लास, स्पोर्ट क्लास,  हॉबी क्लास या सर्व बाबतीतची उपलब्धता करून देण्याची व तो संपूर्ण कार्यक्रम राबवण्याची पालकांमध्ये शर्यतच असलेली लक्षात येत आहे.पालक म्हणून आजूबाजूला उपलब्ध असलेले "बेस्ट पॅकेज" देऊन आप...

उबंतू.....

साधारण 2008 मध्ये उबंतू (ubuntu) या आफ्रिकन संकल्पनेने जागतिक माध्यमांचे लक्ष वेधले व अल्पावधीतच ही संकल्पना जगभरातील कानाकोपर्‍यात पोहोचली. मानवतावादी तत्वज्ञानाची मोठी मोहीम या माध्यमातून जगभर उभी राहण्यास खूप मोठी मदत झाली.वरकरणी ही संकल्पना मानवतावादी असली तरी ती मोठ्या प्रमाणात मनोशास्त्रीय कसोट्यावर उभी राहिलेली आहे हे विसरता कामा नये. व्यक्ती, कुटुंब व समुदाय  स्वतःचे दुःख कुरवाळत बसल्यास त्याचे दुःखामध्ये मानसशास्त्रीय स्तरावर वाढच होत जाते.त्याऐवजी आपले दुःख सर्वांसोबत वाटून वाट्याला आलेला आनंद सुद्धा  वाटल्यास मानसशास्त्रीयरित्या त्याची अनुभूती आपण मोठ्या प्रमाणात अनुभवू शकतो हे सामूहिक मानसशास्त्राचे सिद्धांत उबंतू ने मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवले. आपल्या आजूबाजूला असणारे लोक दुःखीकष्टी असतील तर आपण समाधानाने व आनंदाने राहू  शकणार नाही हे अतिशय सोपे मानसशास्त्रीय सिद्धांत आपल्याला शिकायला उबंतू भाग पाडतो.दुःख हे 'फक्त एकट्या-दुकट्याचे नसून ते सर्व समूहानेच वाटून घ्यायचे असतात' ही वैश्विक व सामूहिक मानसशास्त्रीय उपचार पद्धती उबंतू मुळे आपल्याला शिकायला मिळत...

तक्रारीचे मानसशास्त्र....

  सतत असलेली परिस्थितीबाबत, व्यक्तीबाबत वा घटनेबाबत कुरबुर करत राहणे, तक्रारी  करत राहणे ही सवय आपल्या सर्वांचीच नित्यनियमाची  होत आहे. आजूबाजूची परिस्थिती किती भयंकर, चुकीची व खडतर असल्याच्या सबबी हे सर्व आपल्या  "डिफेन्स मेकॅनिझमची" चलाखी असते. परिस्थिती गंभीर, खडतर व विरोधक  असेलही पण व्यक्तिगत पातळीवर ती संघर्ष व सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला सुद्धा खूप मदत करीत असते.आणि म्हणूनच आजूबाजूला असलेली परिस्थिती, व्यक्ती वा घटना आणि त्यानुसार आपली झालेली अधोगती वा प्रगती असे आलेख व मोजमाप तयार करता येणार नाहीत.आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपण संशयात्मक, भीतीयुक्त, नैराश्यग्रस्ततेने, व आक्रमकतेने बघतांना आपण त्या परिस्थितीतील अपेक्षित असलेल्या सुधारणेतील "आपला सहभाग" गमावून बसत असतो.  व्यक्तिगत, कौटुंबिक वा संस्थात्मक पातळीवर असलेल्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे वा आपल्यामध्ये  परिस्थितीनुरूप बदल करत राहणे हे सतत तक्रार व कुरबुर करत राहण्यापेक्षा उत्तम ठरेल.सतत एखाद्या परिस्थिती, घटनेकडे वा व्यक्तीकडे   निराशावादी दृष्टिकोनातून बघत राहणे वा तक्र...

मानसशास्त्रीय एकटेपणा...

साधारण सहा महिन्यापूर्वी शहरातील मनोविकार तज्ञा कडून राधिकाला (नाव बदललेले आहे) माझ्याकडे समुपदेशनासाठी रेफर करण्यात आले.45 वर्षीय राधिका डिप्रेशन या आजाराशी झगडत होती. राधिकेशी संवाद साधला असताना असे लक्षात आले की तिच्या मानसिक आजारांच्या लक्षणा पेक्षा तिच्या मानसिक  स्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.मध्यमवर्गीय कुटुंबात  जन्मलेली,    B.Sc   पर्यंतचे शिक्षण उत्तम रित्या पूर्ण करून गेल्या बावीस वर्षांपासून  दोन मुलांसह आपला संसार सांभाळणारी राधिका  गेल्या तीन वर्षापासून डिप्रेशन या मानसिक आजाराने ग्रस्त होती. डिप्रेशनच्या निदानानंतर नियमित औषधोपचार घेत असली तरीही मात्र तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होत नव्हती. समुपदेशन दरम्यान  लक्षात आलेली मानसशास्त्रीय बाब आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल. राधिकेचे लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष मुलांचे संगोपन व घरातील  व्यवस्थापनात  अतिशय व्यग्रतेत निघून गेली.       कालांतराने मुले मोठी होत गेली. शिक्षण व  नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात स्थिरावली व रमली सुद्धा...

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने...

  दरवर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक स्तरावर मानसिक आरोग्य संदर्भात निदान, उपचार, पुनर्वसन व जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.2019 यावर्षी प्रेवेंशन ऑफ सुसाईड ही थीम जागतिक मानसिक आरोग्य संघटने कडून जाहीर करण्यात आलेली आहे. भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास डिप्रेशन आणि सुसाईड याबाबतीत भारताने जागतिक अग्रक्रम राखलेला आहे.मानसिक अनारोग्याच्या उच्चतम धोक्याच्या  पातळीवर असणाऱ्या आपल्या देशाला,  समाजाला व पर्यायाने आरोग्य प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य नसावे ही शोकांतिकेची बाब आहे. साधारण प्रत्येक 40 सेकंदांमध्ये कोणीतरी सुईसाईड (आत्महत्या) केल्याचे समोर येत आहे.... मानसिक आजार हे जितके जैविक (biological) असतात त्यापेक्षा कित्येक पटीने  ते मानसिक (psychological), प्रासंगिक (situational), आजूबाजूच्या वातावरणातून (surroundings) , व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतुन (personality factors) व भावनिक (emotional) प्रश्नांमुळे सुद्धा निर्माण होत असतात. उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य उपचार प्रामुख्याने औषधोपचार (रासायनिक गोळ्या औषधे) व इसिटी (शॉक ट्रीटमेंट) ...

गुंतवणूक मानसिक आरोग्यासाठी...

आधुनिक जीवनशैली, स्पर्धा, दैनंदिन ताण-तणाव, विभक्त कुटुंब पद्धती, तणावपूर्ण नातेसंबंध असे एक ना  अनेक कारणांमुळे मानसिक आरोग्याची पातळी वैयक्तिक, सामाजिक  व  शासकीय स्तरावर ढासळत असताना जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने 2020 यावर्षी इन्व्हेस्ट इन मेंटल हेल्थ (मानसिक आरोग्य मध्ये गुंतवणूक करा) असे जागतिक स्तरावर सुचवले आहे... आता मानसिक आरोग्यामध्ये गुंतवणूक म्हणजे फक्त आर्थिक बाबतीत नसून बऱ्याच बाबींवर अवलंबून असणार आहे...  (1) मानसिक आरोग्य बाबतीत जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती वैयक्तिक व सामाजिक स्तरावर मिळवावी लागेल...  (2)मानसिक आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली आत्मसात करावी लागेल... (3) मानसिक आरोग्याच्या बाबतीत गरज पडल्यास उपचार, समुपदेशन (counselling) व पुनर्वसन सेवा घेण्यास वैयक्तिक,  कौटुंबिक  व सामाजिक संकोच दूर करावे लागतील.... (4) मानसिक रुग्णांना दिलासा, काळजी व सहकार्य देण्याची भूमिका वठवावी लागेल... (5)शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आरोग्य विषय तपासणी शिबिरे आयोजित करावी लागतील... (6) अतिकमी प्रमाणात असलेले मानसिक आरोग्य विषयक मानसोपचार...

मनाचा रावण.....

  रामायण मधील रावण हे पात्र जेवढे निंदनीय आहे तेवढेच अभ्यासनीय सुद्धा आहे.अतिज्ञानी, पंडित, पराक्रमी व तेवढाच दयाळू अशा अनेक विभूतीने तो सज्ज आहे. रावणाचा मोह फक्त सीते पुरताच मर्यादित नव्हता . तो आपल्या भक्तीच्या, शक्तीच्या व युक्तीच्या जोरावर ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न करायचा जे त्याला हवं होतं (भौतिक जीवनातील सर्व सुख-सुविधा  हात जोडून उपलब्ध असणाऱ्या रावणाला खरंच कशाची कमी होती का?) लौकिक अर्थाने आयुष्य जगणार्‍या रावणाला सुद्धा आपल्या गरजा  पूर्ण करता आल्या नसतील तर त्या गरजा वास्तविक होत्या की मानसिक?. मुळातच सर्व काबीच करू शकणाऱ्या रावणाला आपले मन मात्र काबीज करता आले नाही. मानवरूपी रावणाला भेडसावणाऱ्या मनाच्या समस्या आजच्या मानवी समुदायाला तंतोतंत लागू पडताना दिसतात. विश्व  जिंकू पाहणाऱ्या मानवी समुदायाला भीती, शंका, मोह, संताप, अहंकार,  द्वेष, वासना, वैफल्यग्रस्तता,  चिंता आणि ताण-तणाव हे सर्व सांभाळता येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल.आणि म्हणूनच देहरूपी  रावणाचे  दहन करताना  त्यातील  मनाच्या रावणाचे पण दहन करणे गरजेचे आहे. दसरा...

आपुलाची वाद आपणाशी....

  तुकाराम महाराजांच्या एका अभंगांमध्ये असलेली ही पंक्ती  आपल्या आजच्या मानसिक अवस्थेला अगदी तंतोतंत प्रतिबिंबित करते. एकीकडे चूक की बरोबर, नीती की अनीती,  धर्म की अधर्म, पर्सनल की प्रोफेशनल, करियर की कुटुंब, बंधने की स्वातंत्र्य, संपत्ती की नैतिकता, पदप्रतिष्ठा की समाधान, वाद की सामोपचार, पैसा कि ज्ञानसाधना व कर्तव्य  की संधी अशा एक ना अनेक वादामध्ये आपण स्वतःला रोज अनुभवतो. अशा सर्व वादांना सामोरे जाणारा आपला एकमेव जोडीदार म्हणजे आपलं मन (मेंदू)  निर्माण झालेल्या दैनंदिन वादामुळे थकतो, घाबरतो, चिंतातूर होतो, सैरावैरा होतो, बेचैन होतो, अस्वस्थ होतो व पर्यायाने आपले मानसिक संतुलन गमावून बसतो. आणि म्हणूनच अश्या परिस्थितीमध्ये गरज असते योग्य त्या संवाद रुपी समुपदेशनाची ज्यामुळे मन (मेंदु) आपल्या भूमिका, परिस्थिती व निर्णय प्रक्रियेमध्ये स्थिर राहून मानसिक गुंते निर्माण होऊ देत नाही व कायम वादांमध्ये न अडकता संवादाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतो. आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या वादांना सामोरे जाण्यासाठी व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी संवादही महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच...

कुटुंबच मानसिक आजारी असेल तर.....

  सामाजिकरण्याच्या  प्रक्रियेमध्ये "कुटुंब"  संस्थेचे स्थान व महत्त्व आजही अबाधित असून दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मानसिक आरोग्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेली संस्था असेही कुटुंबसंस्थेला म्हटले तरी चुकीचे होणार नाही. प्रेम, काळजी, नातेसंबंध, जिव्हाळा, पाठबळ, कौतुक, विश्वास व शिस्त अशा विविध  रसायनातून कुटुंब नावाचा घटक बनत असतो.  पण बऱ्याचदा चित्र असेच असेल असे सांगता येत नाही.घरामध्ये सततची भांडणे, मारहाण, शिवीगाळ, दारिद्र्य, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, लैंगिक शोषण, अशांत व टीकात्मक वातावरण, पालकत्वाची भूमिका व कर्तव्याचा अभाव, घटस्फोट व एकेरी पालकत्व अशा विविध परिस्थितीतून जाणारे कुटुंब बहुतांशी मानसिक स्तरावर आजारीच ठरतात. अशा कुटुंबांमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची सुरुवात व्हायला वेळ लागत नाही. अशा आजारी कुटुंबांना व त्यातील प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते. कुटुंबाचे वर्तन, कृती व विचार प्रणाली पूर्ववत किंवा नवीन पद्धतीची बनवण्यासाठी दीर्घकालीन मानसोपचाराची गरज असते....