मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
रामायण मधील रावण हे पात्र जेवढे निंदनीय आहे तेवढेच अभ्यासनीय सुद्धा आहे.अतिज्ञानी, पंडित, पराक्रमी व तेवढाच दयाळू अशा अनेक विभूतीने तो सज्ज आहे. रावणाचा मोह फक्त सीते पुरताच मर्यादित नव्हता . तो आपल्या भक्तीच्या, शक्तीच्या व युक्तीच्या जोरावर ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न करायचा जे त्याला हवं होतं (भौतिक जीवनातील सर्व सुख-सुविधा हात जोडून उपलब्ध असणाऱ्या रावणाला खरंच कशाची कमी होती का?) लौकिक अर्थाने आयुष्य जगणार्या रावणाला सुद्धा आपल्या गरजा पूर्ण करता आल्या नसतील तर त्या गरजा वास्तविक होत्या की मानसिक?.
मुळातच सर्व काबीच करू शकणाऱ्या रावणाला आपले मन मात्र काबीज करता आले नाही. मानवरूपी रावणाला भेडसावणाऱ्या मनाच्या समस्या आजच्या मानवी समुदायाला तंतोतंत लागू पडताना दिसतात. विश्व जिंकू पाहणाऱ्या मानवी समुदायाला भीती, शंका, मोह, संताप, अहंकार, द्वेष, वासना, वैफल्यग्रस्तता, चिंता आणि ताण-तणाव हे सर्व सांभाळता येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल.आणि म्हणूनच देहरूपी रावणाचे दहन करताना त्यातील मनाच्या रावणाचे पण दहन करणे गरजेचे आहे. दसरा रुपी सणातून आपली सर्वांची मने मानसिक स्तरावर प्रज्वलवीत व्हावी हीच अपेक्षा!
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment