Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

मानसशास्त्रीय एकटेपणा...

साधारण सहा महिन्यापूर्वी शहरातील मनोविकार तज्ञा कडून राधिकाला (नाव बदललेले आहे) माझ्याकडे समुपदेशनासाठी रेफर करण्यात आले.45 वर्षीय राधिका डिप्रेशन या आजाराशी झगडत होती. राधिकेशी संवाद साधला असताना असे लक्षात आले की तिच्या मानसिक आजारांच्या लक्षणा पेक्षा तिच्या मानसिक  स्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.मध्यमवर्गीय कुटुंबात  जन्मलेली,  B.Sc पर्यंतचे शिक्षण उत्तम रित्या पूर्ण करून गेल्या बावीस वर्षांपासून  दोन मुलांसह आपला संसार सांभाळणारी राधिका  गेल्या तीन वर्षापासून डिप्रेशन या मानसिक आजाराने ग्रस्त होती. डिप्रेशनच्या निदानानंतर नियमित औषधोपचार घेत असली तरीही मात्र तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होत नव्हती. समुपदेशन दरम्यान  लक्षात आलेली मानसशास्त्रीय बाब आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल. राधिकेचे लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष मुलांचे संगोपन व घरातील  व्यवस्थापनात  अतिशय व्यग्रतेत निघून गेली. 

    कालांतराने मुले मोठी होत गेली. शिक्षण व  नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात स्थिरावली व रमली सुद्धा. नवऱ्याचा उद्योग वाढल्यामुळे त्याचीही व्यग्रता वाढली. याचाच परिणाम म्हणून सतत व्यग्र,बडबड  व कायम  बिझी असणारी  राधिका  एकटी  पडायला लागली.कालांतराने  तिला एकटेपणाची सवय करून घ्यावी लागली. मुळातच  सामाजिक व बाह्यवक्र (extrovert) व्यक्तिमत्व असणाऱ्या राधिकेला एकटेपणाशी मैत्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. सतत बडबड व आनंदी राहणारी राधिका आता गप्प राहायला सुरुवात झाली. हळूहळ, टप्प्याटप्प्याने राधिकेची मानसिक स्थिती ढासळत  राहिली  व गेल्या  तीन वर्षापासून  डिप्रेशन आजारासाठी  औषधोपचार सुरू झाले. गेल्या सहा महिन्यापासून समुपदेशन अंतर्गत कुटुंब व सर्वांना तिच्या एकटेपणाची कल्पना करून देण्यात आली.  हळूहळू  कुटुंबाच्या  मदतीने  व सहभागाने  तिचा  एकटेपणा  कमी  करण्यावर  एकमत  करण्यात आले . 

कुटुंबाच्या माध्यमातून व त्यांच्या सहभागातूनच राधिकेच्या एकटेपणावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात  मात करण्यात आली. हळूहळू राधिका बऱ्याच अंशी सावरत होती. औषधांचा परिणाम अधिकाधिक जाणवत होता. आपले सामाजिक जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्नही ती करत होती. त्याचाच एक भाग म्हणून तिने छोटसं ऑनलाईन मार्केटिंग स्टार्टअप सुद्धा तिने सुरु केला. एकंदरीत पूर्वीची राधिका टप्प्याटप्प्याने परत येत आहे.अजूनही  बराच  टप्पा गाठायचा  असला  तरीही  राधिका व त्यांचे कुटुंब  त्यासाठी  पूर्णपणे तयार आहे. डिप्रेशन हे जितकं बायलॉजिकल असतं तितकच ते सायकॉलॉजिकल व एन्व्हायरमेंटल पण असू शकतं. मुळातच तिचा मानसशास्त्रीय एकटेपणा (loneliness) हाच तिच्या आजाराचा मूळ पाया होता. आजारापेक्षा आपण एकटे पडत आहोत ही भावना माणसाला मानसिक स्थिरता लाभू देत नाही. असा हा मानसशास्त्रीय एकटेपणा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.आणि म्हणूनच  आपल्या मनाचा एकटेपणा  हा मानसिक आजार नसला  तरीही त्याचे  योग्य व्यवस्थापन करणे मानसिक आरोग्य संवर्धनाची पायरीच ठरेल.


©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...