Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

उबंतू.....

साधारण 2008 मध्ये उबंतू (ubuntu) या आफ्रिकन संकल्पनेने जागतिक माध्यमांचे लक्ष वेधले व अल्पावधीतच ही संकल्पना जगभरातील कानाकोपर्‍यात पोहोचली. मानवतावादी तत्वज्ञानाची मोठी मोहीम या माध्यमातून जगभर उभी राहण्यास खूप मोठी मदत झाली.वरकरणी ही संकल्पना मानवतावादी असली तरी ती मोठ्या प्रमाणात मनोशास्त्रीय कसोट्यावर उभी राहिलेली आहे हे विसरता कामा नये. व्यक्ती, कुटुंब व समुदाय  स्वतःचे दुःख कुरवाळत बसल्यास त्याचे दुःखामध्ये मानसशास्त्रीय स्तरावर वाढच होत जाते.त्याऐवजी आपले दुःख सर्वांसोबत वाटून वाट्याला आलेला आनंद सुद्धा  वाटल्यास मानसशास्त्रीयरित्या त्याची अनुभूती आपण मोठ्या प्रमाणात अनुभवू शकतो हे सामूहिक मानसशास्त्राचे सिद्धांत उबंतू ने मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवले.

आपल्या आजूबाजूला असणारे लोक दुःखीकष्टी असतील तर आपण समाधानाने व आनंदाने राहू  शकणार नाही हे अतिशय सोपे मानसशास्त्रीय सिद्धांत आपल्याला शिकायला उबंतू भाग पाडतो.दुःख हे 'फक्त एकट्या-दुकट्याचे नसून ते सर्व समूहानेच वाटून घ्यायचे असतात' ही वैश्विक व सामूहिक मानसशास्त्रीय उपचार पद्धती उबंतू मुळे आपल्याला शिकायला मिळते. आपण सर्व जण एकमेकांना प्रभावित करीत असतो व एकमेकांकडून प्रभावित होत असतो. ह्या मानसशास्त्रीय सिद्धांताचा सुरेख उपयोग उबंतू मुळे अनुभवयाला मिळतो. मुळातच गट, कुटुंब, समाज व संस्था त्यांची धोरणं व काम करण्याच्या पद्धती मध्ये मानसशास्त्रीय सिद्धांताचा आधार घेणे किती महत्वाचे आहे हे  उंबतू मुळे अधोरेखित होताना दिसत आहे. एकदा एका आफ्रिकन आदिवासी , अतिशय गरीब व दुर्गम अशा भागांमध्ये एक बाहेरील व्यक्ती काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातो.आणि एका झाडाखाली ठेवतो त्या गटांमध्ये असलेल्या सर्व मुलांना एका दूर ठिकाणी बोलवतो आणि म्हणतो पळून जाऊन त्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी घेऊन जाऊ शकता. सर्वात अगोदर जो पोहचेल त्याला सर्वात जास्त चॉकलेट् व बिस्किट्स मिळतील व  त्याने सर्व मुलांना पळून जाऊन त्या गोष्टी घेण्यास सांगितल्या परंतु घडले वेगळेच ती सर्व मुलं जरी गरीब, उपाशी व दुर्गम भागातील असली तरीही सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घातले व समान पद्धतीने चालत जाऊन उपलब्ध असलेल्या सर्व चॉकलेट्स व  बिस्किटांचे समान पद्धतीने वाटप केले व त्याची खातरजमा झाल्यानंतरच त्यांनी ते खायला सुरुवात केली. 

हे बघताच सर्वांच्या डोळ्यात वेगळेच भाव निर्माण झाले. आणि हे सर्व घडलं होतं फक्त आणि फक्त उबंतू मुळे कारण इथे 'प्रत्येकाचं दुःख हे प्रत्येकाचे नव्हतं तर ते समूहाचे होतं' आणि ही सामुहिक दुःखाची प्रक्रियाच उपचारात्मक प्रक्रियेचा भाग बनली होती फक्त उबंतु मुळे...So would you like to be a part of Ubuntu?

©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...