Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

मनाचं कौन्सिलिंग...

 विवेकवाद आधारित मानसशास्त्रीय उपचार प्रक्रिया (REBT)ही जगभरामध्ये मानसिक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात  उपचार करणारी मानसशास्त्रीय उपचार प्रणाली असून सौम्य प्रकारच्या मानसिक आजारावर अतिशय प्रभावी ठरते. भीती (fobia), न्यूनगंड (inferiority complex), नैराश्य (depression), ताणतणाव (stress), नातेसंबंध तणाव (relationship problem) व चिंता (anxiety) अशा अनेक मानसिक समस्यावर REBT खूप उपयोगी ठरते.

    अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनी या थेरपीचा शोध लावला असून सर्वसामान्य लोकांना या उपयुक्त असणाऱ्या मानसशास्त्रीय उपचार प्रणाली ची माहिती व्हावी यासाठी हा लेख प्रपंच. उपचारादरम्यान खालील बऱ्याच मुद्द्यांवर समुपदेशक (mental health counselor)  व मानसिक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये दीर्घकालीन चर्चा घडून येते व व्यक्तीच्या सध्याच्या मानसिक स्थिती मध्ये  भावनिकदृष्ट्या (emotional), वैचारिकदृष्ट्या (cognitive) व कृतीयुक्त (behavioral) बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मुळातच ही उपचार प्रक्रिया टप्प्याटप्प्याने घडून येणारी असून त्यातील पहिला स्‍व- विश्लेषणाचा  टप्पा आपल्याशी शेअर  करीत आहे.

सत्र क्रमांक-१  (स्व विश्लेषण)     
(1) माझ्या मानसिक मान्यता (my beliefs) मी तपासून घेतलेल्या आहेत.
(2) माझा दृष्टिकोन (my views)  मी तपासून घेतलेला आहे.                             
(3) माझा आयुष्याबद्दलचा व स्वतःबद्दलचा पूर्वानुभव (past experiwnce) त्रासदायक आहे. 
(4) माझ्यातील अतार्किक मानसिक मान्यता (illogical beliefs) मला त्रासदायक ठरत आहे.                  (5) दुसऱ्यांना माझ्या अपयशाचे दोष देणे माझ्या विचारसरणीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.        
(6) माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण नकारात्मक पद्धतीने माझ्याकडून होत आहे.    
(7) दुसऱ्या लोकांकडून मिळालेल्या  वागणुकीमुळे माझी निराश होण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.             
(8) प्रत्येक प्रयत्नांमध्ये मला शंभर टक्के यश मिळालेच पाहिजे असे मला वाटते.       
(9) माझ्या आयुष्यातील अडचणीमुळे मी मागे पडलोय व पडतोय असे मला वाटत राहते.       
(10) माझा आनंद दुसऱ्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.        
(11) माझा आनंद मी स्वतः निर्माण करू शकत नाही.      
(12) दुसर्यांकडुन मान्यता मिळणे (recognition) मला महत्त्वाचे वाटते.       
(13) मला बऱ्याच गोष्टींचा पश्‍चाताप आहे.                                
(14) बऱ्याच गोष्टींमध्ये मी निराशा अनुभवलेली आहे.               
(15) माझे भूतकाळातील अनुभव अतिशय त्रासदायक आहेत.                  
(16) मी माझे भूतकाळ बदलू शकत नाही व विसरू पण शकत नाही.                      
(17) मी  स्वतःच्या विचार प्रणालीमुळे बराच त्रस्त झालेला/ झालेली आहे.       
 (18) मला माझी विचारणारी बदलणे गरजेची  वाटत आहे.                   
(19) मला एक नवीन विचारसरणी निर्माण करण्याची गरज आहे.      
(20) मी स्वतः माझ्या  विचारांमध्ये सकारात्मक  व गरजेचे  बदल घडवून आणण्यासाठी  मला मानसशास्त्रीय  मदतीची गरज आहे.
 
    सुरुवातीला मानसिक रूग्णांवर वापरण्यात येणारी ही थेरपी कालांतराने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा उपयोगात येत गेली. या थेरपीच्या वापरामुळे व उपयोगामुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप मोठी मदत होते हे संशोधनाअंती सुद्धा मान्य झालेले आहे. आणि म्हणूनच मानसिक सुदृढतेसाठी REBT प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे...
             
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...