Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...

Are you engaging in oneself

 बहुतांश वेळा आपल्या मनाला आपल्या स्वतःमध्ये 'रमायला' (engaging in oneself) अजिबात आवडत नाही...  तो इतरांसोबत भटकतो, गुंततो, रमतो, दमतो, संघर्ष करतो, कंटाळून जातो, मानसिक रित्या आजारी पडतो, चिडतो, वादविवाद करीत राहतो, कटकारस्थान यांचा भाग बनत राहतो, इतरांना जिंकण्याचा व काबुत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहतो... असे अनेक प्रकार केल्यानंतर मात्र स्वतःचा 'शोध' घेण्यास सुरुवात करतो... तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो...  ज्याला स्वतःसोबत रमायला किंवा असायला 'आवडत' नाही त्याला जगातली कुठलीच गोष्ट आनंद समाधान व  निरोगीपणा निर्माण करू शकणार नाही... 😊 have a wonderful day to all of you.... ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सेलर Mob-9420461580 सकारात्मक मानसिक आरोग्य   माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्हाट्सअप उपक्रम जॉईन करू शकता... https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59

मनाचा डस्टबिन...

 आपल्या घरामध्ये जसा डस्टबिन (कचरा डबा) ठेवलेला असतो.. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा एक 'डस्टबिन' तयार करणे अत्यावश्यक आहे... आपल्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह, निरर्थक, भीती, चिंता, दडपण, राग निर्माण करणारे, भूतकाळातील घटना, पश्चाताप, आपल्या नातेसंबंधातील ताण तणाव अशा अनेक मनाला 'आजारी' करणाऱ्या गोष्टी त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टाकत राहिल्या हव्यात..  आणि आपल्या मनाचा डस्टबिन 'पूर्णपणे' भरला की तो स्वच्छ व रिकामा सुद्धा करता आला पाहिजे... पूर्णपणे भरलेला, अतिशय दुर्गंधीयुक्त मनाचा डस्टबिन आम्ही कौन्सिलर म्हणून 'सहज' स्वीकारतो..त्याला स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स सुद्धा शिकवतो.. 'अट' एकच आहे की त्या व्यक्तीला आपल्या मनाचा डस्टबिन 'खरच' स्वच्छ करायचा असायला हवा..  😊 have a wonderful day to all of you.... ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सेलर Mob-9420461580 सकारात्मक मानसिक आरोग्य   माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्हाट्सअप उपक्रम जॉईन करू शकता... https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59

वाळूवर निर्माण केलेले घर

समुद्रकिनारी वाळूचे घर बनवताना ते येणाऱ्या पुढच्या लाटेमध्ये वाहून जाईल याची आपल्याला 'पूर्व' कल्पना असते....तरी आपण अतिशय मन लावून आनंदाने समुद्रकिनारी वाळूचं घर बनवतो.. ठरल्याप्रमाणे पुढच्या काही लाटांमध्ये ते घर वाहून जात.. बऱ्याच एकाग्रतेने व जिद्दीने बनवलेलं ते वाळूचे घर वाहून जाताना त्रास पण होतो.. आणि आनंद सुद्धा...  आपल्या 'वैयक्तिक' आयुष्यातही आपण 'निर्माण' केलेल्या आपल्या कल्पनांना, भावनांना, कृतींना, विचारांना व बऱ्याच संकल्पनांना वेळोवेळी तयार करणे हे 'नैसर्गिक' असलं तरी... काळाच्या व परिस्थितीच्या ओघामध्ये वाहून जाताना आपल्याला त्रास कमी व आनंद अधिक व्हायला हवा.. कारण समुद्रकिनारी जसे वाळूचे घर कधीही टिकू शकत नाही... तसेच आपण निर्माण केलेल्या व गरज नसलेल्या संकल्पना, कृती, विचार व वेगवेगळ्या कल्पना यांना विसर्जित करून देण्यामध्येच जीवनाचं 'नैसर्गिक' तत्व समाविष्ट आहे... 😊 have a wonderful day to all of you.... ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सेलर Mob-9420461580 सकारात्मक मानसिक आरोग्य   माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्ह...

जे आपल्याकडे आहे ते पुरेसं नाही का?

 आपल्याकडे जे काही आज उपलब्ध आहे त्याची मुळातच आपल्याला 'किंमत' नाही...  आई-वडील असताना त्यांच्याकडे आपण 'दुर्लक्ष' करतो व ती  गेल्यानंतर मात्र आपण ओक्षाबोक्षी रडतो.. आपल्या जोडीदारांमध्ये आपला 'रस' दिवसेंदिवस कमी होत जातो व दुसऱ्या जोडीदारांमध्ये रमबाण होण्याची 'स्वप्न' आपण बघत राहतो... आपल्या मुलांपेक्षा इतरांची मुलं आपल्याला 'अधिक' सरस, हुशार व तरबेज भासतात... आपली आर्थिक स्थिती इतरांपेक्षा खूपच 'कमकुवत' आहे असं नेहमीच आपल्याला वाटत राहतं.. आज आपण 'सुरक्षित' आहोत या भावनेपेक्षा..उद्याचा भविष्यकाळ खूपच 'चिंतायुक्त' आहे असा आपल्याला सतत वाटत राहतं.. आज शरीराची 'काळजी' न घेता अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागेल यासाठी इन्शुरन्स पॉलिसी किंवा पैसे जमा करणे आपण 'महत्त्वाचे' समजतो... आज उपलब्ध असलेल्या नातेसंबंधांमध्ये 'कमतरता' किंवा उणिवा 'शोधत' राहतो व नाते संपुष्टात आल्यानंतर किमान नाते तरी 'जिवंत' असायला पाहिजे होतं! असं मनात हजार वेळा 'विचार' करतो... आपल्या मनाला प्रत्येक ठिकाणी ...

सुखानंतर दुःख का येतो?

आपल्या आयुष्यात निर्माण झालेला 'आनंद' काही काळाने आपोआप निघून जातो...पण त्याच पद्धतीने आयुष्यात निर्माण झालेले 'दुःख'  आपोआप का निघून जात नाही ?... याचे 'मूळ' कारण म्हणजे आपण 'स्वतः' आहोत.. कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच 'निर्माण' व्हावा व 'थोडं' ही दुःख येऊ नये अशी मानसिक कल्पना आपण अगोदरच 'निर्माण' करून ठेवलेली असते...  सुख-दुःखाचा 'क्रम' हा अगदी त्या ऊन-सावली सारखा असतो आणि तो कधीच 'चुकणारा' नसतो...  हजारो वर्षापासून सुख-दुःख आणि ऊन-सावली सोबत सोबत चालत आहेत.. ही जोडी कधीही 'विभक्त' करता येणार नाही..  आपल्याला फक्त 'आनंदच'  हवा असला तरी  त्याबरोबर किंवा त्या मागोमाग दुःख आपला 'पाठलाग' करून आपल्याला 'गाठणारच' आहे.. ज्याला खरोखरच आनंदी व समृद्ध व्हायचं असेल त्याने आनंदाप्रमाणेच दुःख सुद्धा 'स्वीकारयाला' सुरुवात करायला हरकत नाही..  आपण या सुख-दुःखाच्या जोडीला 'स्वाभाविकपणे' स्वीकारणं हेच सदैव 'आनंदी' राहण्याचं  मूळ स्वरूप आहे... 😊 😊 have a w...