आपल्या आयुष्यात निर्माण झालेला 'आनंद' काही काळाने आपोआप निघून जातो...पण त्याच पद्धतीने आयुष्यात निर्माण झालेले 'दुःख' आपोआप का निघून जात नाही ?...
याचे 'मूळ' कारण म्हणजे आपण 'स्वतः' आहोत.. कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच 'निर्माण' व्हावा व 'थोडं' ही दुःख येऊ नये अशी मानसिक कल्पना आपण अगोदरच 'निर्माण' करून ठेवलेली असते...
सुख-दुःखाचा 'क्रम' हा अगदी त्या ऊन-सावली सारखा असतो आणि तो कधीच 'चुकणारा' नसतो...
हजारो वर्षापासून सुख-दुःख आणि ऊन-सावली सोबत सोबत चालत आहेत.. ही जोडी कधीही 'विभक्त' करता येणार नाही..
आपल्याला फक्त 'आनंदच' हवा असला तरी त्याबरोबर किंवा त्या मागोमाग दुःख आपला 'पाठलाग' करून आपल्याला 'गाठणारच' आहे..
ज्याला खरोखरच आनंदी व समृद्ध व्हायचं असेल त्याने आनंदाप्रमाणेच दुःख सुद्धा 'स्वीकारयाला' सुरुवात करायला हरकत नाही..
आपण या सुख-दुःखाच्या जोडीला 'स्वाभाविकपणे' स्वीकारणं हेच सदैव 'आनंदी' राहण्याचं मूळ स्वरूप आहे... 😊 😊 have a wonderful day to all of you....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
सकारात्मक मानसिक आरोग्य माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्हाट्सअप उपक्रम जॉईन करू शकता...
https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59
Comments
Post a Comment