Skip to main content

Posts

Showing posts from 2020

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

रेडीमेड पालकत्व.....

बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो.याच काळात व्यक्तीची  शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो. पालक म्हणून सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा याची मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो.परंतु  गेल्या काही काळापासून  पाल्य, पालकत्व व एकूणच शिक्षण व्यवस्था  याबाबत  गंभीर प्रश्न  समोर येताना दिसतात  आणि त्याची  मुळे शोधणे गरजेचे वाटतात. हल्लीच्या पालकत्वाची संकल्पना पूर्णपणे पाश्चिमात्य देशाच्या विचारसरणीवर आधारित होताना दिसत आहे.  मुलाच्या/ पाल्याच्या जन्माबरोबरच त्याची शाळा, शिक्षणाचे माध्यम, ट्युशन क्लास, स्पोर्ट क्लास,  हॉबी क्लास या सर्व बाबतीतची उपलब्धता करून देण्याची व तो संपूर्ण कार्यक्रम राबवण्याची पालकांमध्ये शर्यतच असलेली लक्षात येत आहे.पालक म्हणून आजूबाजूला उपलब्ध असलेले "बेस्ट पॅकेज" देऊन आप...

उबंतू.....

साधारण 2008 मध्ये उबंतू (ubuntu) या आफ्रिकन संकल्पनेने जागतिक माध्यमांचे लक्ष वेधले व अल्पावधीतच ही संकल्पना जगभरातील कानाकोपर्‍यात पोहोचली. मानवतावादी तत्वज्ञानाची मोठी मोहीम या माध्यमातून जगभर उभी राहण्यास खूप मोठी मदत झाली.वरकरणी ही संकल्पना मानवतावादी असली तरी ती मोठ्या प्रमाणात मनोशास्त्रीय कसोट्यावर उभी राहिलेली आहे हे विसरता कामा नये. व्यक्ती, कुटुंब व समुदाय  स्वतःचे दुःख कुरवाळत बसल्यास त्याचे दुःखामध्ये मानसशास्त्रीय स्तरावर वाढच होत जाते.त्याऐवजी आपले दुःख सर्वांसोबत वाटून वाट्याला आलेला आनंद सुद्धा  वाटल्यास मानसशास्त्रीयरित्या त्याची अनुभूती आपण मोठ्या प्रमाणात अनुभवू शकतो हे सामूहिक मानसशास्त्राचे सिद्धांत उबंतू ने मोठ्या प्रमाणात यशस्वी करून दाखवले. आपल्या आजूबाजूला असणारे लोक दुःखीकष्टी असतील तर आपण समाधानाने व आनंदाने राहू  शकणार नाही हे अतिशय सोपे मानसशास्त्रीय सिद्धांत आपल्याला शिकायला उबंतू भाग पाडतो.दुःख हे 'फक्त एकट्या-दुकट्याचे नसून ते सर्व समूहानेच वाटून घ्यायचे असतात' ही वैश्विक व सामूहिक मानसशास्त्रीय उपचार पद्धती उबंतू मुळे आपल्याला शिकायला मिळत...

तक्रारीचे मानसशास्त्र....

  सतत असलेली परिस्थितीबाबत, व्यक्तीबाबत वा घटनेबाबत कुरबुर करत राहणे, तक्रारी  करत राहणे ही सवय आपल्या सर्वांचीच नित्यनियमाची  होत आहे. आजूबाजूची परिस्थिती किती भयंकर, चुकीची व खडतर असल्याच्या सबबी हे सर्व आपल्या  "डिफेन्स मेकॅनिझमची" चलाखी असते. परिस्थिती गंभीर, खडतर व विरोधक  असेलही पण व्यक्तिगत पातळीवर ती संघर्ष व सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला सुद्धा खूप मदत करीत असते.आणि म्हणूनच आजूबाजूला असलेली परिस्थिती, व्यक्ती वा घटना आणि त्यानुसार आपली झालेली अधोगती वा प्रगती असे आलेख व मोजमाप तयार करता येणार नाहीत.आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये आपण संशयात्मक, भीतीयुक्त, नैराश्यग्रस्ततेने, व आक्रमकतेने बघतांना आपण त्या परिस्थितीतील अपेक्षित असलेल्या सुधारणेतील "आपला सहभाग" गमावून बसत असतो.  व्यक्तिगत, कौटुंबिक वा संस्थात्मक पातळीवर असलेल्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणे वा आपल्यामध्ये  परिस्थितीनुरूप बदल करत राहणे हे सतत तक्रार व कुरबुर करत राहण्यापेक्षा उत्तम ठरेल.सतत एखाद्या परिस्थिती, घटनेकडे वा व्यक्तीकडे   निराशावादी दृष्टिकोनातून बघत राहणे वा तक्र...

मानसशास्त्रीय एकटेपणा...

साधारण सहा महिन्यापूर्वी शहरातील मनोविकार तज्ञा कडून राधिकाला (नाव बदललेले आहे) माझ्याकडे समुपदेशनासाठी रेफर करण्यात आले.45 वर्षीय राधिका डिप्रेशन या आजाराशी झगडत होती. राधिकेशी संवाद साधला असताना असे लक्षात आले की तिच्या मानसिक आजारांच्या लक्षणा पेक्षा तिच्या मानसिक  स्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.मध्यमवर्गीय कुटुंबात  जन्मलेली,    B.Sc   पर्यंतचे शिक्षण उत्तम रित्या पूर्ण करून गेल्या बावीस वर्षांपासून  दोन मुलांसह आपला संसार सांभाळणारी राधिका  गेल्या तीन वर्षापासून डिप्रेशन या मानसिक आजाराने ग्रस्त होती. डिप्रेशनच्या निदानानंतर नियमित औषधोपचार घेत असली तरीही मात्र तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होत नव्हती. समुपदेशन दरम्यान  लक्षात आलेली मानसशास्त्रीय बाब आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी दिशादर्शक ठरू शकेल. राधिकेचे लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष मुलांचे संगोपन व घरातील  व्यवस्थापनात  अतिशय व्यग्रतेत निघून गेली.       कालांतराने मुले मोठी होत गेली. शिक्षण व  नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात स्थिरावली व रमली सुद्धा...

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने...

  दरवर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक स्तरावर मानसिक आरोग्य संदर्भात निदान, उपचार, पुनर्वसन व जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.2019 यावर्षी प्रेवेंशन ऑफ सुसाईड ही थीम जागतिक मानसिक आरोग्य संघटने कडून जाहीर करण्यात आलेली आहे. भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास डिप्रेशन आणि सुसाईड याबाबतीत भारताने जागतिक अग्रक्रम राखलेला आहे.मानसिक अनारोग्याच्या उच्चतम धोक्याच्या  पातळीवर असणाऱ्या आपल्या देशाला,  समाजाला व पर्यायाने आरोग्य प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य नसावे ही शोकांतिकेची बाब आहे. साधारण प्रत्येक 40 सेकंदांमध्ये कोणीतरी सुईसाईड (आत्महत्या) केल्याचे समोर येत आहे.... मानसिक आजार हे जितके जैविक (biological) असतात त्यापेक्षा कित्येक पटीने  ते मानसिक (psychological), प्रासंगिक (situational), आजूबाजूच्या वातावरणातून (surroundings) , व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतुन (personality factors) व भावनिक (emotional) प्रश्नांमुळे सुद्धा निर्माण होत असतात. उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य उपचार प्रामुख्याने औषधोपचार (रासायनिक गोळ्या औषधे) व इसिटी (शॉक ट्रीटमेंट) ...

गुंतवणूक मानसिक आरोग्यासाठी...

आधुनिक जीवनशैली, स्पर्धा, दैनंदिन ताण-तणाव, विभक्त कुटुंब पद्धती, तणावपूर्ण नातेसंबंध असे एक ना  अनेक कारणांमुळे मानसिक आरोग्याची पातळी वैयक्तिक, सामाजिक  व  शासकीय स्तरावर ढासळत असताना जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने 2020 यावर्षी इन्व्हेस्ट इन मेंटल हेल्थ (मानसिक आरोग्य मध्ये गुंतवणूक करा) असे जागतिक स्तरावर सुचवले आहे... आता मानसिक आरोग्यामध्ये गुंतवणूक म्हणजे फक्त आर्थिक बाबतीत नसून बऱ्याच बाबींवर अवलंबून असणार आहे...  (1) मानसिक आरोग्य बाबतीत जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती वैयक्तिक व सामाजिक स्तरावर मिळवावी लागेल...  (2)मानसिक आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली आत्मसात करावी लागेल... (3) मानसिक आरोग्याच्या बाबतीत गरज पडल्यास उपचार, समुपदेशन (counselling) व पुनर्वसन सेवा घेण्यास वैयक्तिक,  कौटुंबिक  व सामाजिक संकोच दूर करावे लागतील.... (4) मानसिक रुग्णांना दिलासा, काळजी व सहकार्य देण्याची भूमिका वठवावी लागेल... (5)शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आरोग्य विषय तपासणी शिबिरे आयोजित करावी लागतील... (6) अतिकमी प्रमाणात असलेले मानसिक आरोग्य विषयक मानसोपचार...

मनाचा रावण.....

  रामायण मधील रावण हे पात्र जेवढे निंदनीय आहे तेवढेच अभ्यासनीय सुद्धा आहे.अतिज्ञानी, पंडित, पराक्रमी व तेवढाच दयाळू अशा अनेक विभूतीने तो सज्ज आहे. रावणाचा मोह फक्त सीते पुरताच मर्यादित नव्हता . तो आपल्या भक्तीच्या, शक्तीच्या व युक्तीच्या जोरावर ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न करायचा जे त्याला हवं होतं (भौतिक जीवनातील सर्व सुख-सुविधा  हात जोडून उपलब्ध असणाऱ्या रावणाला खरंच कशाची कमी होती का?) लौकिक अर्थाने आयुष्य जगणार्‍या रावणाला सुद्धा आपल्या गरजा  पूर्ण करता आल्या नसतील तर त्या गरजा वास्तविक होत्या की मानसिक?. मुळातच सर्व काबीच करू शकणाऱ्या रावणाला आपले मन मात्र काबीज करता आले नाही. मानवरूपी रावणाला भेडसावणाऱ्या मनाच्या समस्या आजच्या मानवी समुदायाला तंतोतंत लागू पडताना दिसतात. विश्व  जिंकू पाहणाऱ्या मानवी समुदायाला भीती, शंका, मोह, संताप, अहंकार,  द्वेष, वासना, वैफल्यग्रस्तता,  चिंता आणि ताण-तणाव हे सर्व सांभाळता येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल.आणि म्हणूनच देहरूपी  रावणाचे  दहन करताना  त्यातील  मनाच्या रावणाचे पण दहन करणे गरजेचे आहे. दसरा...

आपुलाची वाद आपणाशी....

  तुकाराम महाराजांच्या एका अभंगांमध्ये असलेली ही पंक्ती  आपल्या आजच्या मानसिक अवस्थेला अगदी तंतोतंत प्रतिबिंबित करते. एकीकडे चूक की बरोबर, नीती की अनीती,  धर्म की अधर्म, पर्सनल की प्रोफेशनल, करियर की कुटुंब, बंधने की स्वातंत्र्य, संपत्ती की नैतिकता, पदप्रतिष्ठा की समाधान, वाद की सामोपचार, पैसा कि ज्ञानसाधना व कर्तव्य  की संधी अशा एक ना अनेक वादामध्ये आपण स्वतःला रोज अनुभवतो. अशा सर्व वादांना सामोरे जाणारा आपला एकमेव जोडीदार म्हणजे आपलं मन (मेंदू)  निर्माण झालेल्या दैनंदिन वादामुळे थकतो, घाबरतो, चिंतातूर होतो, सैरावैरा होतो, बेचैन होतो, अस्वस्थ होतो व पर्यायाने आपले मानसिक संतुलन गमावून बसतो. आणि म्हणूनच अश्या परिस्थितीमध्ये गरज असते योग्य त्या संवाद रुपी समुपदेशनाची ज्यामुळे मन (मेंदु) आपल्या भूमिका, परिस्थिती व निर्णय प्रक्रियेमध्ये स्थिर राहून मानसिक गुंते निर्माण होऊ देत नाही व कायम वादांमध्ये न अडकता संवादाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतो. आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या वादांना सामोरे जाण्यासाठी व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी संवादही महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच...

कुटुंबच मानसिक आजारी असेल तर.....

  सामाजिकरण्याच्या  प्रक्रियेमध्ये "कुटुंब"  संस्थेचे स्थान व महत्त्व आजही अबाधित असून दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मानसिक आरोग्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेली संस्था असेही कुटुंबसंस्थेला म्हटले तरी चुकीचे होणार नाही. प्रेम, काळजी, नातेसंबंध, जिव्हाळा, पाठबळ, कौतुक, विश्वास व शिस्त अशा विविध  रसायनातून कुटुंब नावाचा घटक बनत असतो.  पण बऱ्याचदा चित्र असेच असेल असे सांगता येत नाही.घरामध्ये सततची भांडणे, मारहाण, शिवीगाळ, दारिद्र्य, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, लैंगिक शोषण, अशांत व टीकात्मक वातावरण, पालकत्वाची भूमिका व कर्तव्याचा अभाव, घटस्फोट व एकेरी पालकत्व अशा विविध परिस्थितीतून जाणारे कुटुंब बहुतांशी मानसिक स्तरावर आजारीच ठरतात. अशा कुटुंबांमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची सुरुवात व्हायला वेळ लागत नाही. अशा आजारी कुटुंबांना व त्यातील प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते. कुटुंबाचे वर्तन, कृती व विचार प्रणाली पूर्ववत किंवा नवीन पद्धतीची बनवण्यासाठी दीर्घकालीन मानसोपचाराची गरज असते....

टक्केवारीचे मानसशास्त्र...

दरवर्षीप्रमाणे दहावी व बारावी परीक्षेचे निकाल जाहीर  झालेले असतील... शाळा,  महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग व पालक यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुकात दंग असतील... त्याचबरोबर नापास, अयशस्वी व कमी मार्क्स  मिळवलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे जगच पूर्णपणे बदललेले असेल...आयुष्यात सर्व काही संपलं अशी मनोभूमिका विद्यार्थी व पालकांच्या मनात उचंबळून येत असेल... पण शांत डोक्याने विचार केल्यास असे लक्षात येईल की गेल्या दशकात शिक्षणातील अमुलाग्र बदलामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झालेली असली तरी गुणवत्तेच्या नावाने आजही बोंबाबोंब आहे.. (बेस्ट ऑफ फाईव्ह व अंतर्गत गुण यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे)     आजचा यशस्वी विद्यार्थी अधिक टक्केवारी मुळे गुणवत्ता प्राप्त झाला असे ठामपणे सांगता येणार नाही.. एकूणच शिक्षण पद्धतीत दिलेला अभ्यासक्रम कोण किती अचूक पद्धतीने पूर्ण करतो याला अफलातून महत्त्व आले असतांना... विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्य (life skills), नवनिर्मिती (innovations), संशोधनवृत्ती (research aptitude), मूल्य संव...

निराशा जिंकली...

अंधाराच्या ढिगार्‍यात  जेव्हा प्रकाशाचा एकही कण सापडत नाही ... माणसांच्या तुडुंब गर्दीत जेव्हा कोणीही आपलेस वाटत नाही... कर्तुत्वाच्या शिखरावर जेव्हा आनंद व  समाधान हिरावून घेतल्या जातो... चेहऱ्यावरचे बनावटी हास्य  जेव्हा आतून पोखरून गेल्याची जाणीव होऊ देत नाही... निराशेच्या खाईत  जेव्हा मदतीचा हात मिळत नाही... असंच काहीसं तुझ्या सोबत झालेल असेल  पण आम्ही कोणीही समजून घेण्याचा  प्रयत्नच केला नाही   ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ 9420461580   डिप्रेशन या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या सर्वांना समर्पित...

Dear sushant..We will miss you ...

                                                         अचानक अखाद्या व्यक्तीची विशेषताह               ( सेलिब्रिटीची  )आत्महत्या झाल्यानंतर संपूर्ण जनमानस विविध  स्तरावर चर्चा , विचार  मंथन व व चर्चासत्राच्या माध्यमातून आपआपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. कालांतराने समस्या जैसे थे ....समस्या तश्याच रहतात व प्रतिक्रिया हवेत उड्न जातात. शारीरिक आरोग्या बाबतीत आपण सर्वजन मोठ्या प्रमाणात जागरूक असल्याचे स्पष्टपने लक्षात येते पण मानसिक आरोग्या बाबतीत  चित्र अगदी उलट आहे.  शरीर आणी  मन (मे़दुं) ह्या दोन्ही अविभकक्त  बाबी आहेत आणी उत्तम आरोग्य साठी दोघांचे संवर्धन करने हिच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आधुनिक जिम, योगा केंद्र, न्यूट्रीशन डायट क्लिनिक, शारीरिक आरोग्य सुविधा पुरवणारे डॉक्टर्स,  क्लीनिकस, हॉस्पिटल्स, मॉर्निंग वॉक साठी वाढणारी गर्दी  आपनास शारीरिक आरोग्य जप...

लेटस फाईट टुगेदर विथ स्किझोफ्रेनिया...

गेल्या कित्येक दशकापासून वैद्यकीय शास्त्राला औषध- निर्मात्या संशोधकांना कायमस्वरूपी चकवा देण्यात स्किझोफ्रेनिया (schizophrenia) या मानसिक आजाराला यश मिळालेले आहे... आजही मनोविकार तज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात स्किझोफ्रेनिया बाबत हाती आलेल्या तथ्याबाबत सहमती बरोबरच मतभिन्नता पण तेवढ्याच प्रमाणात कायम आहे... मानसिक आजाराची उच्चतम पातळी गाठणाऱ्या स्किझोफ्रेनिया या आजार होण्याच्या कारणा बाबत ठोस असे काही हातात लागलेले नाही... यावरूनच या आजाराची गंभीरता लक्षात येते...  माणसाच्या भावनांमध्ये (emotions), वर्तणूकमध्ये (behaviour), विचारांमध्ये (thought process) व एकंदरीतच संपूर्ण मनो-विश्‍वामध्ये प्रचंड उलथापालथ करून स्किझोफ्रेनिया थांबत नाही तर असलेल्या लक्षणांमध्ये नेहमीच उलटपालट/ बदल करत राहून मनोविकारतज्ञ, कुटुंबाला व स्वतः रुग्णाला सुद्धा दिशाहीन करण्याची क्षमता या आजारामध्ये आहे... आजच्या घडीला स्किझोफ्रेनियाच्या उपचाराकरिता परिणामकारक औषधे उपलब्ध असली तरी रुग्णांच्या लक्षणांमध्ये घट करण्याच्या क्षमते पर्यंतच ती उपयोगाची आहे... स्किझोफ्रेनियाला मोठ्या प्रमाणात अटकाव घालू शकणारे औषधो...

सुरवंट ते फुलपाखरू एक मानसशास्त्रीय प्रवास...

आपण सर्वांनाच सुंदर, रंगबिरंगी व आकर्षक असणारे फुलपाखरू आवडतात... पण फुलपाखरू बनण्याचा जीवनप्रवास खूपच खडतर व क्लेशदायक असतो... साधारण एका छोट्याशा बीजांडा पासून सुरवंटाचा (caterpillar) फुलपाखरू बनवण्याचा जीवन प्रवास सुरू होतो....   हळूहळू शारीरिक आकारमान वाढत राहिल्यामुळे छोट्याशा बीजांडा राहणे त्या सुरवंटाला असाह्य  होत राहतं...हा त्रास कमी कि काय जेव्हा  बीजांडा मधून बाहेर पडण्याची यायची वेळ होते तेव्हा... बीजांडाचे कवच  फुटता फुटत नाही... एकीकडे  सुरवंटाचे वाढलेले शारीरिक आकारमान  व बीजांडाचे न फुटणे त्यामुळे त्याला प्रचंड कोंडमारा सहन करणे  क्रमप्राप्त असते... पण तरीही सुरवंट आपला प्रयत्न सोडत नाही..     पूर्ण ताकदीनिशी बीजांडाला धडक मारत राहतो...  व एक दिवशी यशस्वी पण होतो... जो सुरवंट हे करू शकला नाही त्याला बिजांडातुन बाहेर येणे शक्य नसतं... ह्या सर्व जीवन  प्रवासात एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की... शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेवरच ह्या सुरवंटाचे जन्म व फुलपाखरू बनणे अवलंबून असतं... जे सुरवंट आपली मान...

विचारांचे च्युंगम...

विचार करण्याची क्षमता हा मानवी उत्क्रांतीचा महत्त्वाचा पाया आहे... आज तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा मानवी विचारांचे महत्त्व अबाधित आहे... विचारांची शृंखला पुढे जाऊन कृतीत परावर्तित होत असते (our thoughts reflects in our action and behaviour) त्यामुळे आपली कृती ही आपल्या विचारांचेच प्रतिनिधित्व करीत असते...सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनात वेगवेगळे विचार आपल्या मेंदूमध्ये येणे स्वाभाविक असले तरी त्यावरचे नियंत्रण सतत राखणे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते...    जेव्हा व्यक्ती आपल्या सतत येणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास अयशस्वी ठरतो व सततचा अतीविचारांचा ओघ वाढत राहतो तेव्हा निर्माण झालेला एक विचार... पुढच्या दुसऱ्या विचाराला निर्मित करतो व विचारांची ही सर्कस सुरू होते... महत्त्वाची बाब म्हणजे निर्माण झालेल्या अतिविचारांची ही मालिका त्या व्यक्तीच्या वैचारिक पद्धतीचा मुख्य भाग बनते... निर्माण झालेले अतिरिक्त विचार हे मुळातच कुचकामी, निरर्थक व दिशाहीन असतात...    सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अतिशय निरर्थक विचारांच्या ट्रॅफिक मुळे व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढणे,...

कौन्सिलीग इन पॉर्नोग्राफी एडिक्शन....

 माझ्याकडे समुपदेशनासाठी वय 14 (इयत्ता ८) ते 56 वर्षांचे गृहस्था पर्यंत पॉर्नोग्राफी अडिक्शनशी झुंजत असलेल्याचा  समावेश असून... पॉर्नोग्राफीने  मानवी मनावर किती व्यापक परिणाम केल्याचे यावरून स्पष्ट होते....मुळातच मानवी लैंगिकता हा कुतूहलाचा, अंतर्गत आनंदाचा व स्व-प्रगटीकरण्याचा मूळ स्तोत्र म्हणून आपण सर्वांना परिचित असला तरी व्यापक दृष्टिकोनातून बघितल्यास व्यक्तीची लैंगिकता अनेक बाबींवर अवलंबून असते उदाहरणार्थ..  व्यक्तीची मानसशास्त्रीय जडणघडण, जैविक (biological), सामाजिक, भावनिक, आर्थिक, कौटुंबिक, मित्रमंडळी,  पूर्वानुभव, दृष्टिकोण, लैंगिकतेबाबत चे ज्ञान व त्याचे  व्यक्तीमत्व  अशा अनेक गोष्टींचा यात समावेश करता येईल ...    मुळातच आपली लैंगिकता ही एक सर्वसामान्य मानवी गरजेचा भाग असला तरी त्याचे प्रकटीकरण वैयक्तिक स्तरावर होत असल्यामुळे त्याच्यातील दोषाचे  परिणाम त्या व्यक्तीवर, त्याच्या जोडीदारावर व एकूणच संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर पडत असतात....    आणि म्हणूनच पॉर्नोग्राफी एडिक्शनशी झुंजत असलेल्या व्यक्तीला पारंपारिक पद्धतीने द...

फॉलो द नेचर.....

कोरोना संक्रमण नंतर जगभर कधी नव्हे तेवढी भीती, चिंता, नैराश्य व उदासीनता आपण सर्वजण अनुभवत आहोत.... या सर्व शारीरिक, मानसिक, आर्थिक व राजकीय उलथापालथ  नंतर सुद्धा आपण शांतपणे विचार केला तर असे लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्ग आजही तेवढाच  शांत व स्थितप्रज्ञ आहे... सूर्य आपल्या वेळेवर उगवतोय व मावळतोय सुद्धा... पक्षी आजही तेवढ्याच आत्मविश्वासाने गगनभरारी मारताना दिसतात... सकाळचा मंद वारा आजही तेवढाच हवाहवासा वाटतो... रात्रीचा चंद्र आजही तेवढाच शितल आहे...    झाडांची सळसराट... फळां व फुलांचे बहरुन घेणे...‌ यावरून स्पष्ट होते की आपल्या आजूबाजूला एक आश्‍वासक निसर्ग आहे.... या आश्वासक निसर्गात आपल्यालाही वास्तव्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा चंद्र, सूर्य व ताऱ्यांना कारण आपण या सर्वांचाच एक अविभाज्य घटक आहोत... पण ही भीती, चिंता, नैराश्य व उदासीनता याचा खरा निर्माता कोण?...तर उत्तर आपण सर्वांना माहिती आहे... आपण नैसर्गिक नियमाचे कायम उल्लंघन करीत करीत आलेले आहोत... एवढेच नव्हे तर पर्यावरणीय, राजकीय आर्थिक,  सामाजिक व नैतिक मूल्यांना कायम पायी तुडवत आलेल...

मानसिक उपचाराची सद्यस्थिती

मानसिक आरोग्याच्या उपचार, पुनर्वसन, समुपदेशन व प्रतिबंध या सर्वच घटकांमध्ये भारताची आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे... एकूणच प्रशिक्षित मानसिक आरोग्य  कर्मचाऱ्यांची कमतरता, सामाजिक जागृतीचा अभाव, वाढते ताणतणाव व मानसिक आरोग्याकडे बघण्याच्या कलंकित दृष्टिकोनामुळे (stigma) दिवसेंदिवस मानसिक आरोग्याची सार्वजनिक उपचार व्यवस्था ढासळतच राहणार आहे यात दुमत नाही....    आणि म्हणूनच परिणाम स्वरूपी डिप्रेशन आणि सुसाईड याबाबतीत भारताने जागतिक अग्रक्रम राखलेला आहे.... मानसिक अनारोग्याच्या उच्चतम धोक्याच्या  पातळीवर असणाऱ्या आपल्या देशाला,  समाजाला व पर्यायाने आरोग्य प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य नसावे ही शोकांतिकेची बाब आहे.... मानसिक आजार हे जितके जैविक (biological) असतात....त्यापेक्षा कित्येक पटीने  ते मानसिक (psychological), प्रासंगिक (situational/environment al), आजूबाजूच्या वातावरणातून (surroundings) , व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतुन (personality factors) व भावनिक (emotional) प्रश्नांमुळे सुद्धा निर्माण होत असतात... उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य उपचार प्रा...

एक मानसिक लढा कोरोनाशी.

साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या आर्थिक-सामाजिक व राजकीय अस्थिरतेमुळे महायुद्धामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांपेक्षा त्या देशातील सामान्य नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक आजार उद्भवले होते....आणि अल्पावधीतच हजारोच्या संख्येने निर्माण झालेल्या मानसिक रुग्णांना उपचारासाठी तातडीने मनोरुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती... ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या परिस्थितीला समर्पक भासत आहे....  कोरोना (COVID-19) नावाच्या विषाणूमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाल्याचे आपण सर्वजण अनुभवत आहोत... आपल्या आखीव-रेखीव आयुष्यात असे काहीतरी आगळेवेगळे होईल याची आपल्याला पुसटशीही कल्पना असू नये हे विशेष! .....   याचाच अर्थ असा की जगाचा भूतकाळ व वर्तमानकाळ लक्षात घेता भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जागतिक स्तरावरच्या समस्यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी आपल्याला आजच करून घ्यावी लागेल... उदाहरणार्थ जगाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा परिणाम आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असे म्हणता म्हणता आपण सर्वजण आज मुक्त अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनत गेलेलो आह...

गरज संपूर्ण मानसोपचाराची....

 आजची पोस्ट  माझ्या व्यावसायिक  स्तरावरच्या अनुभवावर आधारित आहे असून मानसिक आरोग्य क्षेत्रात समुपदेशन (counselling) व पुनर्वसन (rehabilitation) कार्यक्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवावर आधारित आहे....मानसिक रुग्णांमध्ये प्रामुख्याने १) न्यूरैटीक ( चिंता व तणावातून निर्माण होणारे सौम्य प्रकारचे मानसिक आजार)२) सायकॉटिक ( गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार) ३) अडिक्शन (व्यसनाधीनता) ४) व्यक्तिमत्त्वाचे आजार (personality disorder) ५)  मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे निर्माण झालेली मानसिक आजार (ऑरगॅनिक ब्रेन डिसऑर्डर) अशा विविध आजारांचे मनोरुग्ण प्रामुख्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेत असतात... साधारण तीन ते चार वर्ष घरगुती, धार्मिक, आयुर्वेदिक व इतर उपचार पद्धती करून आलेले मनोरुग्ण व त्यांचे कुटुंब लक्षणे हाताबाहेर गेल्या नंतर मानसोपचार तज्ञाकडे  धाव घेतात....   सहाजिकच तीन ते चार वर्षापासून सुरू झालेल्या मानसिक आजार आपल्या उच्च स्तरावर असल्यामुळे दीर्घकालीन मानसोपचाराची गरज असते... अशा परिस्थितीत सुरुवातीचे काही दिवस/महिने/ वर्ष उपचार घेतल्यानंतर मानसिक आ...

एक पोस्ट...खोडकर व चंचल मुलांच्या पालकांसाठी.......

९ वर्षीय विशाल (नाव बदललेले आहे) माझ्यासमोर आपल्या आई-वडिलांसोबत समुपदेशनासाठी बसला होता. विशालची आई अधिक चिंतातुर असल्यामुळे म्हणाली... मी याचं काय करू ते सांगा सर प्लीज? हा जर असाच त्रास देत राहिला तर आम्ही दोघांनी याला हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे... दोन वर्षापासून आम्ही सर्व प्रयत्न करून बघितले अगदी मारून व सर्व प्रकारच्या शिक्षा देऊन पण यामध्ये काही बदल नाही...हे सर्व ऐकताना मी विशाल चे निरीक्षण करीत होतो... अगदी गोंधळलेल्या चेहऱ्यावर निर्विकार भाव असलेला व  त्याच्या संदर्भातील चाललेल्या  चर्चेचा विशेष परिणाम त्याच्यावर जाणवत नव्हता... असे असले तरी आतून अतिशय गोंधळलेला व  न्यूनगंड निर्माण झालेला विशाल मला अगदी स्पष्टपणे जाणवत होता...    गेल्या दोन वर्षापासून पालक म्हणून विशाल ची मानसिक स्थिती त्यांनी लक्षात न घेतल्यामुळे वा आल्यामुळे  विशालला  सतत मारहाण करणे, कोंडून ठेवणे, टाकून बोलणे व उपाशी ठेवणे अशा अनेक परंपरागत पालकत्वाच्या शिक्षेमुळे विशालच्या लक्षणांमध्ये  अजुनच भर पडली होती.. घरी जशी परिस्थिती होती तशी शा...

Readymade Parenting