Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

अंडरस्टॅंडिंग ऑफ कृष्णा : अ स्टेप टुवर्ड्स पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ.. (Understanding of Krishna: A step towards Positive Mental Health))

अंडरस्टॅंडिंग ऑफ कृष्णा : अ स्टेप टुवर्ड्स पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ.........

तत्त्वज्ञानाने माणसाचे पोट भरत नाही हे खरे असले तरी उपाशीपोटी किंवा पोट भरल्यानंतर माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी तत्वज्ञानची नितांत आवश्यकता असते....आणि म्हणूनच पर्यायाने तत्वज्ञान शिवाय माणूस जिवंत राहू शकेल पण समृद्ध राहणार नाही...... तत्वज्ञान भलेही भौतिक गरजांची पूर्तता करीत नसले तरी व्यक्ती, समाज व पर्यायाने राष्ट्राला मानसिक दृष्ट्या सदृढ करण्याचं काम नेहमी करत असतं.... जगात निर्माण झालेले बहुतांशी तत्वज्ञान हे मानवी उत्थानासाठी निर्माण झालेले असले तरी त्याचा उपयोग विध्वंसासाढी करायचा की विकासासाठी याची जबाबदारी तत्वज्ञान निर्माण करणाऱ्या पेक्षा ते पाळणाऱ्या अनुयायांची अधिक असते.... माणसाकडून निर्माण झालेले शास्त्र व सिद्धांत यालासुद्धा तत्वज्ञानाची जोड असायलाच हवी आणि म्हणूनच शास्त्र आणि तत्वज्ञान परस्पर पुरक असायला हवे..... 
 
मानसशास्त्राच्या परस्परपूरक तत्वज्ञानाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कृष्णाने श्रीमद्भगवद्गीता मध्ये सांगितलेले तत्वज्ञान पॉझिटिव मेंटल हेल्थ च्या संदर्भात एक गाईडलाईन म्हणून अभ्यासायला हरकत नाही....
 
 कृष्णाच्या मते
 (१) मानवी जीवन म्हणजे एक संघर्ष आहे आणि जोपर्यंत मानवी जीवन राहील तोपर्यंत सतत संघर्ष होत राहील....आणि म्हणूनच संघर्षाला न घाबरता संघर्ष म्हणजेच जीवन हे मान्य करणे क्रमप्राप्त ठरते
 (२) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू व सर्वात मोठा मित्र म्हणजे त्याचे स्वतःचे मन व त्याचे स्वतःचे विचार असतात
 (३) दुसऱ्या व्यक्तीकडून व समूहाकडून केलेल्या अपेक्षा हेच मानवी दुःखाचे मूळ कारण आहेत
 (४) मानवी मन एका वादळी वाऱ्याप्रमाणे असून त्याला नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे असते आणि योग्य तो अभ्यास केल्यास त्याच्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते
 (५) मानवी जीवनात येणाऱ्या सुख दुःखांमध्ये समभाव राहणे साठी सतत अभ्यास करत राहणे 
(६) आपली नित्यकर्म करीत राहणे व त्या मोबदल्यात मिळालेल्या परिणामांना संतोष पूर्ण स्वीकारणे 
(७) आपल्या आचरणामध्ये संयम व नम्रता ठेवणे 
(८) परिस्थिती कितीही विपरीत असली तरी आपण निवडलेल्या मार्गावर योग्य पद्धतीने चालत राहणे
 (९) भौतिक प्रगती सोबतच आध्यात्मिक व मानसिक शांती प्राप्त करून घेणे हे सुद्धा मानवी जीवनाचे उदात्त मूल्ये असतात ..... 
 
अशा अनेक तत्वांची यादी करता येईल..... दंतकथेचा एक पात्र म्हणून का होईना कृष्णाने निर्माण केलेल्या तत्वज्ञानाचा मानवी मनाच्या संवर्धनासाठी व आरोग्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे तितकेच खरे आहे 
 
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...