मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
अंडरस्टॅंडिंग ऑफ कृष्णा : अ स्टेप टुवर्ड्स पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ.. (Understanding of Krishna: A step towards Positive Mental Health))
अंडरस्टॅंडिंग
ऑफ कृष्णा : अ स्टेप टुवर्ड्स पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ.........
तत्त्वज्ञानाने माणसाचे पोट भरत नाही हे खरे असले तरी उपाशीपोटी किंवा पोट भरल्यानंतर माणसाचं जीवन
समृद्ध करण्यासाठी तत्वज्ञानची नितांत आवश्यकता असते....आणि म्हणूनच पर्यायाने तत्वज्ञान
शिवाय माणूस जिवंत राहू शकेल पण समृद्ध राहणार नाही...... तत्वज्ञान भलेही भौतिक गरजांची
पूर्तता करीत नसले तरी व्यक्ती, समाज व पर्यायाने राष्ट्राला मानसिक दृष्ट्या सदृढ
करण्याचं काम नेहमी करत असतं.... जगात निर्माण झालेले बहुतांशी तत्वज्ञान हे मानवी उत्थानासाठी निर्माण झालेले असले तरी
त्याचा उपयोग विध्वंसासाढी करायचा की विकासासाठी याची जबाबदारी तत्वज्ञान निर्माण करणाऱ्या
पेक्षा ते पाळणाऱ्या अनुयायांची अधिक असते....
माणसाकडून निर्माण झालेले शास्त्र व
सिद्धांत यालासुद्धा तत्वज्ञानाची जोड असायलाच हवी आणि म्हणूनच शास्त्र आणि तत्वज्ञान
परस्पर पुरक असायला हवे.....
मानसशास्त्राच्या परस्परपूरक तत्वज्ञानाच्या बाबतीत बोलायचे
झाल्यास कृष्णाने श्रीमद्भगवद्गीता मध्ये सांगितलेले तत्वज्ञान पॉझिटिव मेंटल हेल्थ
च्या संदर्भात एक गाईडलाईन म्हणून अभ्यासायला हरकत नाही....
कृष्णाच्या मते
(१) मानवी
जीवन म्हणजे एक संघर्ष आहे आणि जोपर्यंत मानवी जीवन राहील तोपर्यंत सतत संघर्ष होत
राहील....आणि म्हणूनच संघर्षाला न घाबरता संघर्ष म्हणजेच जीवन हे मान्य करणे क्रमप्राप्त
ठरते
(२) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू व सर्वात मोठा मित्र म्हणजे त्याचे स्वतःचे मन
व त्याचे स्वतःचे विचार असतात
(३) दुसऱ्या व्यक्तीकडून व समूहाकडून केलेल्या अपेक्षा
हेच मानवी दुःखाचे मूळ कारण आहेत
(४) मानवी मन एका वादळी वाऱ्याप्रमाणे असून त्याला
नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे असते आणि योग्य तो अभ्यास केल्यास त्याच्यावर नियंत्रण
ठेवले जाऊ शकते
(५) मानवी जीवनात येणाऱ्या सुख दुःखांमध्ये समभाव राहणे साठी सतत अभ्यास
करत राहणे
(६) आपली नित्यकर्म करीत राहणे व त्या मोबदल्यात मिळालेल्या परिणामांना संतोष
पूर्ण स्वीकारणे
(७) आपल्या आचरणामध्ये संयम व नम्रता ठेवणे
(८) परिस्थिती कितीही विपरीत
असली तरी आपण निवडलेल्या मार्गावर योग्य पद्धतीने चालत राहणे
(९) भौतिक प्रगती सोबतच
आध्यात्मिक व मानसिक शांती प्राप्त करून घेणे हे सुद्धा मानवी जीवनाचे उदात्त मूल्ये
असतात .....
अशा अनेक तत्वांची यादी करता येईल.....
दंतकथेचा एक पात्र म्हणून का होईना
कृष्णाने निर्माण केलेल्या तत्वज्ञानाचा मानवी मनाच्या संवर्धनासाठी व आरोग्यासाठी
उपयोग केला जाऊ शकतो हे तितकेच खरे आहे
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment