Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

Ghost of obsession......... (आँबसेशन नावाचे भूत......).


 आँबसेशन नावाचे भूत......

मेंदूमध्ये सतत विचार येणे अतिशय स्वाभाविक आहेत. परंतु आलेले विचार परत परत येणे व व्यक्ती ते थांबवण्यास असमर्थ ठरणे म्हणजेच आँबसेशन....अजूनच सोपी भाषेत सांगायचे झाल्यास विक्रम राजाच्या खांद्यावर ठराविक कालावधीनंतर परत परत मानगुटीवर येऊन बसणारे बेताल नावाचे भूत ...अगदी तशाच पद्धतीने व्यक्तीला विचाराचे आँबसेशन छळत असतात..... हे आँबसेशन तेव्हा अधिक गंभीर बनतात जेव्हा हे आँबसेशन व्यक्तीला काहीतरी कृती करायला बंधनकारक करतात.... आणि  आँबसेशन नंतर त्याला  प्रत्युत्तर म्हणून कृती (actions) असे हे दुष्टचक्र सुरू होते.... आँबसेशनला वेळीच न थांबवल्यास हेच  आँबसेशन त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कार्यक्षमतेचा भाग पूर्णपणे व्यापून टाकतात.... आँबसेशन एक वेळ विचाराचा भाग झाला की त्यावर कृती करणे भाग पडते व कृती न केल्यास व्यक्तीला चैन पडत नाही (so thoughts becomes actions and actions becomes compulsions)..... आणि हे चक्र सतत वेळ, काळ व  प्रसंग यांचे कुठलेही बंधन न जुमानता सतत सुरू राहतात...... व्यक्तीला हे स्पष्टपणे माहीत असतं की आपण वारंवार करीत असलेले विचार (thought) व कृती (actionns)  ह्या निरर्थक  आहेत व त्याचा त्याचा काहीही उपयोग नाही.... तरीसुद्धा व्यक्ती आपले आँबसेशन थांबवु शकत नाही....  

बऱ्याचदा आपल्या  दैनंदिन आयुष्यात घडणार्या बऱ्याच गोष्टी व त्या संदर्भात निर्माण झालेले विचारांचे वलय येथूनच खऱ्या अर्थाने आँबसेशनची सुरुवात होते....आँबसेशनचे दृष्टचक्र  वेळीच थांबवण्यासाठी प्राथमिक स्वरूपात व्यक्तीचे विचारचक्र तोडण्याची (थॉट ब्रेकिंग) गरज असते....कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी चा उपयोग केल्यास रुग्णाला मोठ्या प्रमाणात आँबसेशनला अटकाव करता येतो..... गरज आहे वेळीच आपल्या विचार चक्राला समजण्याची.... त्याला थांबवण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची...... व त्याला अटकाव निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशनाची.…

©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...