मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
रागाचे मानसशास्त्र व व्यवस्थापन.......
व्यक्तीला राग येणं ही नैसर्गिक बाब आहे.राग येत नाही असा एकही व्यक्ती भूतलावर सापडणार नाही. रागाचा दुसरा गुणधर्म म्हणजे ही उस्फुर्त मानसिक प्रतिक्रिया असते.राग व्यक्त करताना मानसिक व शारीरिक स्तरावर विलक्षण प्रतिक्रिया व हालचाली दिसून येतात .प्रथमदर्शनी राग ही नैसर्गिक किंवा उस्फूर्तपणे घडणारी एक मानसिक प्रक्रिया असली तरी रागाचे मानसशास्त्र जाणून घेणे अतिशय रंजक ठरेल.जेव्हा व्यक्तीला आपण स्वतःहा रिजेक्टेड (rejected), अनप्लेझंट (unpleasant) , यूसलेस (useless), अनसक्सेसफुल (unsuccessful) असल्याची खात्री करून घेतो किंवा व्यक्ती जर भयंकर मानसिक, शारीरिक, क्लेशदायक, भीतीदायक व आशारहित परिस्थितीशी झगडत असेल, आणि अशा परिस्थितीशी दोन हात करत असताना त्यातून आपण जेव्हा बाहेर पडू शकत नाही याची खात्री होते किंबहुना हे सर्व सहन करत असताना निर्माण झालेलं मानसिक दुखणं हेच मुळात रागाचे अंतर्गत मानसशास्त्रीय कारण ठरते.मानसशास्त्राच्या पुस्तकांमध्ये anger is substitute emotion म्हणजेच “पर्यायी मानसशास्त्रीय भावना” म्हणून संशोधनाअंती नमूद केलेले आहे.
रागाचे इतर मानसशास्त्रीय कारण सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.जी व्यक्ती मानसिक स्तरावर निर्माण झालेला ताण तणाव यांचे योग्य व्यवस्थापन करू शकत नाही तेव्हा राग हा अपरिहार्य ठरेल.रागाचे दुसरे मानसशास्त्रीय कारण म्हणजे ज्या व्यक्तीकडून वा परिस्थितीमधून मानसिक ताण तनाव निर्माण होतो त्याला प्रत्युत्तर म्हणून रागवणे . तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे निर्माण झालेला ताण-तणाव कमी करण्यासाठी सुद्धा व्यक्ती रागवतात. एकंदरीतच व्यक्ती स्वतःला रीफोकस (refocus), रिलॅक्स (relax) आणि रिॲडजस्ट(readjust) करण्यासाठी सतत “राग”(anger) या मानसशास्त्रीय भावनिक प्रतिक्रियेचा वापर करीत असतात.आणि म्हणूनच बऱ्याचदा स्वतःचे रागवणे आपण जस्टीफाय करीत असतो .रागाचे बरेच तात्पुरते मानसशास्त्रीय फायदे पण आहेत . राग व्यक्त केल्यामुळे व्यक्तीला शारीरिक व मानसिक स्तरावर हलके झाल्यासारखे वाटते.राग व्यक्त केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना आपला स्वतःचा शारीरिक व मानसिक ताण कमी झाल्याचे अनुभव येतो.
बऱ्याच वर्षापासून मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करीत असल्यामुळे सतत चिडचिड होणे किंवा सतत राग येणे हे कॉमन सिम्प्टम्स येऊन बरेच व्यक्ती समुपदेशनासाठी येतात आणि म्हणूनच राग येणे हे जेवढे नैसर्गिक व उस्फुर्त आहे तेवढेच प्रत्येकाने त्याचे मानसशास्त्रीय व्यवस्थापन करणे आनंदी आणि निरोगी मानसिक आरोग्याकडे पहिले पाऊल ठरेल.....
(copy right)
(copy right)
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment