मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
कुछ तो लोग कहेंगे...... बालपणापासून आपण सर्वांनाच लिखित वा अलिखित बरेच सामाजिक संकेत (social norms) शिकवल्या जातात व ते पूर्ण करण्याची सक्ती आपण सर्वजण अनुभवत असतो...... सामाजिक संकेत हे सामाजिकीकरण्याच्या (socialization) प्रक्रियेमध्ये गरजेचे असले तरी त्याचा अवास्तव व अतिरेक वापर मानसिक त्रासदायक असू शकतो... पाळले जाणारे सामाजिक संकेत हे व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे असले तरी बरेच सामाजिक संकेत हे दुजाभाव निर्माण करणारे, आत्मविश्वास कमी करणारे, बोचरे व विदारक पण असतात... पण सामाजिक संस्थेचा एक भाग म्हणून व्यक्ती, कुटुंब व पर्यायाने संपूर्ण समाज हे पाळत राहण्यामध्ये धन्यता मानीत असतो.... हे संकेत घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, ऑफिसमध्ये व सामाजिक जीवनात सर्रास पाळल्या जातात व ते मोडल्यास होणार्या अग्निपरीक्षेस व्यक्ती वा कुटुंबाला सामोरे जाणे क्रमप्राप्त ठरते.......
आपण कसे रहावे...काय बोलावे... काय बोलू नये... काय खावे काय खाऊ नये... कुठले कपडे घालावे... कोणाशी बोलावे कोणाशी बोलू नये...कसे वागावे...कसे वागू नये.. मुलाने कसे वागावे व मुलींनी कसे वागावे या संदर्भातले बरेच ठोकताळे निर्माण केल्या जातात व ते पाळण्याची सक्ती केल्या जाते आणि विशेष म्हणजे त्यासंदर्भात काहीही एक्सप्लेनेशन मागण्याची संधी दिल्या जात नाही.... व ते मोडण्याचा प्रयत्न केल्यास आजूबाजूचे व्यक्ती, नातेवाईक व सामाजिक संस्था वेगवेगळ्या शाब्दिक, व्यवहारीक व वर्तनात्मक पद्धतीने आपल्याला वाळीत टाकत असतात....
परंतु प्रश्न निर्माण होतो जर आजूबाजूला असलेले पारंपारिक सामाजिक संकेत आपली मानसिकता संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर आपल्याला विवेकपूर्ण , स्वातंत्र्य युक्त आयुष्य जगता येईल का ? परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अशा बऱ्याच पारंपारिक संकेतांना आपल्याला तोडावे लागणार आहे......जाचक व पारंपारिक अशा संकेतांना तोडण्यासाठी आपल्याला मात्र आपल्या मनाला( मेंदूला ) प्रशिक्षित करावे लागेल ...... आणि म्हणूनच कुछ तो लोग कहेंगे... लोगो का काम है कहना....हे गीत गुणगुणत राहणे काळाची गरज आहे....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment